Type Here to Get Search Results !

नरक चतुर्दशी मराठी माहिती | narak chaturdashi marathi mahiti

नरक चतुर्दशी मराठी माहिती |नरक चतुर्दशी मराठी कथा | narak chaturdashi  marathi mahiti | Narak chaturdashi Information in marathi 


नरक चतुर्दशी मराठी माहिती


नरकचतुर्दशी माहिती 2022 :  नमस्कार मित्रांनो आज तुम्हाला नरक चतुर्दशी विषयी माहिती ऐकायला मिळेल.नरकचतुर्दशी कधी आहे कणी नरकचतुर्दशी का साजरी करतात त्यामागची कथा हे सर्व खालील लेखामध्ये दुलेल आहे तरी तुम्ही ते शेवट परेंत वाचा.


नरकचतुर्दशी तारिक 2022 : या वर्षी नरकचतुर्दशी ही 24 ऑक्टोबर म्हणजे सोमवार या दिवशी आहे.

नरक चतुर्दशी मराठी माहिती | narak chaturdashi  marathi mahiti


नरकचतुर्दशी या दिवस  श्री कृष्णा ने नरकासुराचा वाढं केला होता त्यामुळे त्या संबंधीत त्याची आख्यायका प्रचलित आहे. या पहाटे श्री कृष्णाने नरकासुराचा वध करून सर्व प्रजेला नरकासुराच्या जुलुमी राजवटीतून सोडवले. नरकासुर हा महान तपस्वी होता त्याने तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि अवध्यत्वाचा म्हणजेच कुणाकडूनही वध होणार नाही असा वर मागून घेतला. त्या वरामुळे त्याने अनेक राजांना हरवूले आणि त्यांच्या कन्या व त्या राज्यांतील स्त्रियांचे अपहरण केले.

अश्या प्रकारे नरकासुराने एकूण १६,१०० स्त्रियांना पळवून नेले आणि त्याना मणिपर्वतावर एक नगर वसवून त्यात त्यांना बंदी करुन ठेवले. त्याने आणगीनात संपत्ती लुटली आणि अश्याच हावेपोटी त्याने देवमाता अदिती यांचे कुंडले व वरुणाचे विशाल छत्रही सुद्धा बळकावले. त्याला मिळालेल्या वरा मुळे तो देव, गंधर्व व मानवांना तापदायक झाला होता.

अनेक गिरिदुर्गांनी वेढलेले नगर म्हणजे प्राग्ज्योतिषपूर हे त्याची राजधानी होती. ही राजधानी आजूबाजूला अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या खंदकांनी, अग्नी,पाणी इत्यादींनी वेढलेली होती. या नरकासुराच्या राजधानीवर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन चाल केली.श्री कृष्णाने नरकासुराच्या देहाचे दोन तुकडे करत त्याचा वध केला. नरकासुराच्या वधाने देवादिकांना, तसेच प्रजेला आनंद झाला. नरकासुराच्या बंदि वासातील कुमारिकांना त्यांचे स्वजन स्वीकारणार नाहीत, हे सर्व जाणून श्री कृष्णाने या १६,१०० कन्यांसोबत विवाह केला व त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून दिली.

श्री कृष्णाच्या या पराक्रमाचे स्मरण म्हणून आश्विन कृष्ण चतुर्दशीस नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जातो. नरकचतुर्दशीच्या दिवशी अलक्ष्मीचे पहाटे दर्शन करून आपल्यातील नरकरूपी पापवासनांचा नायनाट व अहंकाराचे उच्चाटन करायचे आहे. तेव्हाच आत्म्यावरील अहंचा पडदा दूर होऊन आत्मज्योत प्रकाशित होईल असा यामागील संकेत आहे.

या दिवसाल अभ्यंगस्नानाचे महत्त्व असे मानले जाते. सकाळी सकाळी लवकर उठून, संपूर्ण शरीरास तेलाचे मर्दन करून, सुवासिक उटणे लावून, सूर्योदयापूर्वी केलेले स्नान म्हणजे अभ्यंगस्नान होय. नरकचतुर्दशी या दिवशी पहाटे यमासाठी नरकात, म्हणजे आधुनिक परिभाषेत घरातील आदल्या दिवशी घासून पुसून स्वच्छ केलेल्या स्वच्छतागृहात पणती लावण्याची प्रथा आहे.

वर्षक्रियाकौमुदी, धर्मसिंधु या महान ग्रंथांमध्ये सांगितले गेले आहे की आश्विन कृष्ण चतुर्दशी आणि अमावास्येला संध्याकाळी लोकांनी आपल्या हातात मशाली घेऊन त्या आपल्या दिवंगत पूर्वजांसाठी दाखवाव्यात आणि प्रार्थना करावी.नरक चतुर्दशीच्या पहाटे पहाटे पासून फटाके उडवायला सुरुवात होते आणि तिचा शेवट भाऊबीजेच्या रात्री होतो. त्यानंतर घरात उरलेले फटाके तुळशीच्या लग्नादिवशी उडवले जातात आणि संपवतात.

धन्यवाद मित्रहो माहिती आवडली असेल तर प्रतिक्रिया नक्की कळवा.


हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1)या वर्षी नरकचतुर्दशी कधी आहे ?
Ans.या वर्षी नरकचतुर्दशी 24 ऑक्टोबर ला आहे.

Q.2)या दिवशी कृष्णाने काय केले ?
Ans.या दिवशी कृष्णाने नरकासुराचा वध करून प्रजेला त्याच्या जुलुमी राजवटीतून सोडवले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad