Type Here to Get Search Results !

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण | marathwada mukti sangram din speech

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण pdf | marathwada mukti sangram din speech | 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण | 17 saptembar marathwada mukti sangram din speech | मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मराठी भाषण | marathwada mukti sangram din speech in Marathi

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 2022 : नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण 17 सप्टेंबर रोजी सर्व भारत भर साजरा केला जाणारा दिवस म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याबद्दल आपण अतिशय सोपे भाषण बघणारा अहोत. मराठवाडा मुक्ती संग्राम दीन भाषण हे तुम्हाला शालेय जीवनात विविध स्पर्धा मध्ये कामी येते तरी तुम्ही खालील दिलेला लेखात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण शेवट पर्यंत वाचावेत अशी माझी नम्र विनंती.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिन भाषण  | marathwada mukti sangram din speech

आदरणीय व्यासपीठ, ईश्वरतुल्य गुरुजनवर्ग ,उपस्थित मान्यवर आणि माझ्या बालमित्रांनो मी योगेश मोरे आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आज आपण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यासाठी जमलो आहोत.सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
!! समोर होता एकच तारा
अन स्वप्ने पायदळी अंगार
पडली तरी उषःकालाची
हाती मात्र अंधकार
देश सारा उजळला जरी
मराठवाड्याची काजळ रात 
तेव्हा पेटली अग्नीज्वाला
सर्व दूर अंगार मनात !!

मित्रांनो, 150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला. परंतु आपला वनवास काही संपला नाही. मराठ वाड्यावर अजुनही निजामांची सत्ता होती. ते स्वतंत्र भारताचे अस्तित्व मान्य करत नव्हते. निजामाच्या या अन्याय व अत्याचाराला जनता आता फार कंटाळली होती. या अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी स्वामी रामानंद तिर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभारण्यात आली.

तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशावरून हैद्राबाद संस्थानावर सशस्त्र पोलिस बळाचा वापर करण्यात आला. त्यानुसार 13 सप्टेंबर ला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले. त्यामुळे हार पत्करत निजामांनी माघार घेतली. या मुक्ती संग्रा मातील नेत्यांच्या अथक प्रयत्नानंतर व अनेक शूर विरांच्या हुतात्म्यानंतर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. त्यामुळे दरवर्षी 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणून साजरा केला जातो. मिवानी, मराठवाडा मुक्ती संग्राम यज्ञात आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या व या संग्रामात मोलाची योगदान देणाऱ्या सर्व शूर सेनानींना मी वंदन करतो आणि येथे थांबतो.
!! खेलत छातीवर वार
देह झिजवळा मातीसाठी
कित्येकांनी प्राण अर्पिले
मराठवाडयाच्या स्वातंत्र्यासाठी
त्या शुर विरांना 
माझे कोटी-कोटी प्रणाम
ज्यांनी रक्त सांडले आपल्यासाठी !!


हे पण वाचा ⤵️

FAQ
Q.1)मराठवाडा निजामांच्या गुलामगिरीतून मुक्त कधी झाला ?
Ans.17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. 

Q.2)ऑपरेशन पोलो कधी सुरू करण्यात आले ?
Ans.13 सप्टेंबर ला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले.

Q.3) भारत देशाला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
Ans.150 वर्षांच्या गुलामगिरीनंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad